आठवणीशी लग्न

तुझ्या विरहात काय काय सोसले,
सारे सोसून मन स्वतःवर रुसले,
नंतर ते केवळ आठवणींशीच हसले,
कारण आता तिच्यात मन आहे फसले.

ती हि माझ्या प्रेमात फसले जणू,
मला एकलकोंडा नाही देत बनू,
तू तर दिवसा असायचीस सोबत,
ती रात्रीही असते माझ्यासाठी राबत.

तुझी गरज तिने केली थोडी कमी,
शिवाय सोडून नं जाण्याची आहे हमी,
एवढच कि मलाच होते जाणीव,
पण काय करू लोकांची उणीव.

तू आहेस पहिली प्रीत,
शेवट पर्यंत राहीन शोध करीत,
भेटल्यास तुझ्यात होईन मग्न,
पण तोवर आठवणीशी झालेच आहे लग्न.