मनोगत
आठवणींमध्ये खूप ताकद असते. आयुष्यभरही एकटे जगण्याचे सामर्थ्य ही आठवण देते. नजरेला दिसत नसली तरी ही आठवण एवढी जवळीक साधते कि जणू प्रेयसीच होउ पहाते.
कवीच्या मते असे “दृष्ट लागण्याजोगे” प्रेम मिळवण्याची त्याची पात्रता नव्हती. केवळ प्रेयसीची कृपा दृष्टी पडली आणि त्याला भर-भरून प्रेम मिळाले. पण “दृष्ट लागण्याजोगे” होते ते, त्याला दैवाची आणि लोकांची दृष्ट लागलीच. प्रेयसीला कवीपासून हिरावली आणि दुरावली ते हि कपटाने. उशिरा का होई ना कवीने हा कपट ओळखला. प्रेयसीला पुन्हा प्राप्त करण्यासाठी तिला शोधली, परत बोलावली. यांत नाती दुरावली, कर्तव्ये त्यागली, हाल अपेष्टा सहन केल्या. पण उपयोग शून्य.
मात्र तरी ही कवी हरला नाही. प्रेयसीची आठवण त्याने तशीच ह्रिदयात ताजी ठेवली. तिच्या आठवणीत राहून एकतर्फी संवाद साधला. आठवणीला तो एवढा गुरफटून बसला कि ही आठवण त्याची जणू दुसरी प्रेयसी होते. या दुसर्या प्रेयसीच्या सानिध्यात तो आयुष्यही काढायला तयार आहे. कवीची ही सारी खटाटोप प्रेयसीशी एकतर्फी संवादामार्फत “तुझ्या आठवणींत” मांडलेली आहे.
“तुझ्या आठवणींत” चे आणखी एक विशेष म्हणजे या काव्यसंच्यातील ५० कवितांपैकी प्रत्येक कवितेत “आठवण” हा शब्द किमान एकदा तरी आहेच.
तर बघू या कवी आपल्या प्रेयसीला एकतर्फी संवादातून “तुझ्या आठवणींत” काय काय सांगतो ते.