आठवण तुझी

आठवण तुझी येते सारखी,
ती कधी झाली ना पारखी,
जा म्हणून नाही जात,
पण ती ही नाही देणार ना आघात.

आपलं प्रेम नव्हतं आधी,
ओळख ही नव्हती साधी,
घडलं ते भले कळत न कळत,
पण आयुष्याचीच झाली उलथापालथ.

उलथापालथ आधी होती सकारात्मक,
पण नियतीने घडवलीच ती चकमक,
तू ही घायाळ मी ही घायाळ,
साथ देणारा कोणीच भेटला ना दयाळ.

सारे आघात पचले,
पण तुझ्याशिवाय काही ना सुचले,
तुझ्या आठवणीत नेहमी राहिलो जळत,
पण जळते आयुष्याच आज आहे रुळत.