नाते नवे

भले गेलीस विरहाशी नाते जोडून,
तरी म्हणणार ना गेलीस मला सोडून,
कारण सोपवून गेलीस आठवणींच्या हाती,
त्या ही आहेत माझी तेवढीच काळजी घेती.

कुणीच केले ना एवढे जवळ,
तुलाच जवळचा वाटलो केवळ,
म्हणूनच तर एवढी काळजी घेतली,
सारी प्रीत माझ्यावर ओतली.

तुझ्याकडे काहीच ना ठेवलीस बाकी,
ज्याने भडकली इतरांची डोकी,
इतरांनी जुळवले विरहाशी नाते नवे,
केले जे दैवाला होते हवे.

पण आठवण नेहमीच सोबत राहिली,
तुझी कर्तव्ये तिने वाहिली,
माहीत ना आपण पुन्हा कधी भेटू,
पण तिचा हात आता ना देणार सुटू.