केले तुझ्या प्रेमाचे जतन,
पण कसे करू विरहाचे पतन,
ज्यासाठी आहे खूप झटलो,
पण यशाच्या किरणांनाही नाही भेटलो.
पण कसे करू विरहाचे पतन,
ज्यासाठी आहे खूप झटलो,
पण यशाच्या किरणांनाही नाही भेटलो.
वर्षे लोटली तू दुरावून,
निसर्ग ही थकला असेल ऋतुचक्र फिरवून,
पण माझे चक्र तुझ्या आठवणी भोवतीच फिरते,
फिरून फिरून तुझी आठवणच उरते.
या आठवणीने कधी स्वस्थ ना बसू दिले,
ना जास्त डोळे होऊ दिले ओले,
तुला शोधण्यावर असायचा सारा भर,
त्यासाठी कधी जागलोही रात्रभर.
विश्वास ठेवला कधीतरी बरसेल ती सर,
ना नियतीचा ना दैवाचा ठेवला डर,
आज ही लक्ष तेच भले बदलले मार्ग,
तुझ्याशिवाय ना असेल माझा स्वर्ग.