नवस

दिवसामागून गेले दिवस,
वाया गेले माझे सारे नवस,
तू कधी आलीस ना परत,
मी मात्र आजही आहे अपेक्षा करत.

अपेक्षाच नाही, प्रयत्नेही चालू ठेवलेत,
सारे मार्ग पाहिलेले आजवर भावलेत,
पण यशाचे किरण ही ना नजरेस पडले,
कायम राहिले जे विरहाशि नाते जडले.

पण हा विरह नको वाटतो,
बर्‍याचदा मन रागाने पेटतो,
विरहाची असते त्यावर गरम फुंकर,
आणखी कशी घेऊ त्याच्याशी टक्कर.