मनोगत
दैवाने कवीसोबत दुहेरी खेळी खेळली, जी त्याला कधीच नीटशी नाही कळली. आधी अनमोल असे प्रेम भर-भरून मिळवून देउन मग ते हिरावून ही घेण्यात आले. कारणे सामाजिक, कौटुंबिक किंवा व्यक्तिगत जी काही असतील, पण हिरावले ते अचानक आणि कोणतीही पूर्व कल्पना न देता.
अशा प्रकारे कवीच्या आयुष्यात विरह येते. हा विरहाचा प्रकार कवीसाठी नवीन असतो. त्याची कुचंबना होते. संदर्भात तो आपल्या प्रेयसीशी एकतर्फी संवाद साधतो आणि आपल्या मनाची अवस्था मांडतो. हि मनाची कुचंबना आणि एकतर्फी संवाद या काव्यसंचात मांडला आहे.
“तुझ्या विरहात” चे आणखी एक विशेष म्हणजे या काव्यसंच्यातील ५० कवितांपैकी प्रत्येक कवितेत “विरह” हा शब्द किमान एकदा तरी आहेच.
तर बघू या कवी आपल्या प्रेयसीला काय म्हणतो “तुझ्या विरहात…”