आपली सोबत टिकली ना जास्त,
पण समजू नको झाला अस्त,
तन-मनाच्या कणाकणात ती भिणले,
तू नाही पण जीवनासाठी ती आहे बनले.
पण समजू नको झाला अस्त,
तन-मनाच्या कणाकणात ती भिणले,
तू नाही पण जीवनासाठी ती आहे बनले.
ना जुमानला विरहाचा कायदे कानून,
सोबत राहिलीस तू आठवण बनून,
कधी थोडेही ना विसर पडले,
उलट वेगळेच नाते जडले.
आयुष्यभर सांभाळेन हे नाते,
याच्या आड ना येणार जिवंत भुते,
सुख-दुःखाची तीच आता साथी,
नाही भुलणार जोवर होत नाही माझी माती.