मनोगत
आपल्या पैकी बहुतेकांच्या आयुष्यात प्रेम नावाचे काटकोनी वळण एकदा तरी येते. मग कोणी किती ही काटले अर्थात अडवले ना तरी मनाला अडवता येत नाही. काही होकारार्थी तर काही नकारार्थी असे बरेच बदल आयुष्यात घडत असतात.
आपल्या कवीच्या आयुष्यात सुद्धा असा काटकोनी वळण आला, ज्याने कवीला अंतरबाह्य बदलले. आधी प्रेमाची तृष्णा मग प्राप्ती मग विकास आणि मग विरह अशा सर्व प्रेमाच्या पायर्या कवीला अनुभवायला मिळाल्या. कवीने त्याचा हा प्रेम प्रवास काव्य रुपात मांडला आहे. ज्याचे नाव आहे “पहिल्या प्रेमात”
पाहू तर या काय काय घडते कवीच्या “पहिल्या प्रेमात”