मनोगत
कवीच्या आयुष्यात ती वार्याच्या झोतासारखी आली. काही काळ आयुष्य सुखावले आणि मग एकदा अचानक लपून छपून ती कवीच्या आयुष्यातून निघून जाते. त्याला दुरावा देते. तसेच अशी अपेक्षाही करते कि कवीही तिला थोड्या वेळाने विसरून जाईल.
पण कसा विसरणार ? असे प्रेम सगळ्यांनाच नाही मिळत. कवीचे प्रेम दैवाने हिरावले आणि पर्यायाने हरवले होते. दुःख तर होणारच. पण दुःखाला कवटाळून न बसता कवीने तिच्याशी एकतर्फी संवाद साधला. तिला आळवली परत बोलावली आणि बरेच काही. अपेक्षा एकच कि कधीतरी तिला हे कळेल आणि ती परत येईल.
हाच सर्व एकतर्फी संवाद “तुझ्या हरवलेल्या प्रेमात” एकवटला आहे.